Friday 25 October 2019

    "दिवाळीआधीचा पाऊस"

     राञीची वेळ... जाग आला तेव्हा राञीचे १२ वाजुन काही मिनीटे झाली. अंगणात जाऊन बघीतल तर "पाऊसराजा" रिमझीम रिमझीम बरसत होता!दिवाळीच्या आधीचा हा पाऊस मि तरी पहिल्यांदाच अनुभवत होते, गेले ८ दिवस सुर्यनारायणाने दर्शन दिलेल नव्हतं,अधुन मधुन दुपारच्या वेळेला काय तेवढी उन्हाची किरणे पडत होती. दिवाळीच्या कामांमध्ये या पावसाची हजेरी माझ्या जन्मापासुन मला नवीनच वाटत होती,दिवाळीच्या आधी कामांमध्ये आतापर्यंत अनुभवलेली नेहमीची प्रसन्नता,धन्यता,उल्हासिकता यावेळेस कुठेतरी लांबच्या प्रवासाला गेलेली वाटत होती. शेतीमधील सर्व कामे पावसामुळे खोळंबलेली होती.नेहमिची प्रसन्नता नव्हती त्या बरसण्यात! स्पष्ट ओळखायला येत होते...तो दु:खी असलेला भासत होता...जणुकाही त्याच्या रडण्याचा आभास अलगदपणे होत होता.पण त्याच्या रडण्यात आक्रोश,गडबड,गोंधळ नव्हता! होती ती फक्त नीरव शांतता! आपल्या अश्रुंनी तो या धरतीमातेला ओलचिंब करीत होता...पण त्याच्या टपटप पडणाऱ्या थेंबांचा ञास तिलाही होत असेलच की याची त्याला जराही कल्पना नव्हती. तो माञ केविलवाणा रडतच होता.त्याला खुप काही सांगावस वाटत होत,बोलावस वाटत होत... पण ते सारं काही त्या अश्रुंनी पुसुन जात होत.या सर्वांची साक्ष होती फक्त मि...पहाटेचे ४ वाजले तरी झोप आली नाही.
     निसर्गाची पण अद्भुत किमया आहे जोपर्यंत सर्व निसर्गचक्र सुरळीत तोपर्यंत सर्व ठीक थोडासा जरी समतोल बिघडला,कुठेतरी बिनसल,ऋतुचक्र बिघडले की निसर्गाचे दु:ख सुरू, या सर्व चक्राला माणुसही जबाबदार आहे. त्याचा निसर्गातील हस्तक्षेप खुप महत्वाचा आहे. माणसांच पण तसचं असत नाही...पण त्यापासुन इतरांना ञास होतो, निरअपराध जीवांना ञास होतो याचं त्या निसर्गाला किंवा माणसाला कुठे भान असत...त्या पावसाचे अश्रु पहात पहात पुन्हा डोळे कधी लागले कळालेच नाही...
      पण दिपावली म्हणजेच प्रकाशाचा उत्सव...अंधारातुन तेजाकडे जाण्याचा मार्ग. थोडस मंथन केल अन् निसर्गाचा हा ढाचा समजुन घेतला तर त्यावरही मानवाला निश्चितच मात करता येईल याबाबत शंका नाही.निसर्गातील सर्वांत हानीकारक बाब कोणती? हा प्रश्न जर उपस्थित केला तर "प्रदुषण" हे मापक उत्तर देता येइल...निसर्गातील प्रदुषणामुळेच निसर्गाचा समतोल बिघडत आहे अन् त्यामुळेच ऋतुचक्रावरती परिणाम होत आहे ही साधी गोष्ट मानवाच्या कधी लक्षात येईल?...
येणाऱ्या दिवाळीतही सर्वांनी पर्यावरणपुरक, निसर्गाला समजुन प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा थोड्या प्रमाणात जरी निश्चय केला... तर ही  दिवाळी "निसर्गमयी" साजरी केल्याचं समाधान मिळेल...अन् अंधारातुन तेजोमयी प्रकाश निश्चितच प्रेरणादायी ठरेल!
सर्वांना दिपावलीच्या निसर्गमयी शुभकामना!