Monday 9 March 2020

वसंतारंभी रंगोत्सवी पळस

        "वसंतारंभी रंगोत्सवी पळस"

"वसंतारंभी रंगोत्सवी पळस"...
         निसर्गाची पण अद्भुत किमया आहे...नाहीे?सगळीच फुलझाडं अन् फळझाडं सृष्टीच्या निर्मात्याने अगदी साजेशा स्वरूपात योग्य त्या वेळी अन् योग्य त्या ऋतुत तंतोतंत निर्माण केलेली आहेत...ज्या ज्या ऋतुमध्ये जे सण,उत्सव येतात त्या त्या सणांना,उत्सवांना योग्य ती फुलझाडे पुरक अशा पद्धतीने उपयोगी पडत असतात...कोणत्याच ऋतुत न आढळणारी माञ वसंतारंभी रखरखत्या उन्हात बहरलेली पळसाची फुलझाडे रस्त्याच्या कडेला  जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना अगदी मोहीत करतात...न राहवुन त्यांच्याकडे डोळे आकर्षित होतातचं...उन्हाळ्यात निरभ्र निळ्या आकाशी सुर्यनारायण आपल्या पिवळ्या, केशरी रंगांनी जणु धरतीवर आग ओकत असतो, पण जमिनीवर माञ ह्याच रंगांची फुले डोळ्याला सुखवुन जातात ...जणुकाही उन्हाळ्यात आकाशात अन् धरतीवरती उष्णरंगसंगती जुळवुन आणल्या जाते...
     या पळसाच्या फुलांचा अन् माझ्या बालपणींच्या आठवणींचा घनिष्ट संबंध..पळसाची फुले पाहिली की बालपणींच्या आठवणींची एक लहर हळुवारपणे मनाला स्पर्शुन जाते...माझ्या शेतात बालपणापासुन पळसाच झाड आहे...होळी सण जसजसा जवळ यायचा तसंतसं ते झाड जणुकाही मला शेताकडे खुणावत असायच...त्याला कारणही तसच होतं..दरवर्षी रंगपंचमीला माझे बाबा मला त्या झाडाची फुले वेचायला शेतात घेऊन जायचे...वसंत ऋतुला सुरूवात झालेली असायची बारमाही परिक्षा तोंडावर येऊन ठेपलेल्या असायच्या.अभ्यासाबरोबर सण,उत्सव आनंदात साजरे होत असत...त्यात धुलीवंदन,रंगपंचमी म्हणजे लहान मुलांची मौजमजा...मला माञ एकाच गोष्टीची उत्सुकता असायची...ती म्हणजे भगव्या रंगांच्या फुलांची...पक्ष्यांच्या आकाराची ती फुले वेचताना मन अगदी हरखुण जायचं..होळीच्या सणांमध्ये रंगपंचमीला रंग तयार करायचा तो याच फुलांचा, त्यासाठीच ही सर्व धडपड..पिशवी भरून फुले वेचताना बाबाही मदतीला असायचे..घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी ती सर्व फुले एका पातेल्यात उकळायला ठेवली जायची.. अंघोळीच्या वेळी त्या फुलांचा गडद केशरी रंग डोळ्यात साठवुन ठेवावासा वाटत असे..तेव्हा काहीच कळत नसे पण नंतर कळल की नैसर्गिक फुलांच्या रंगाने त्वचेला माञ काहीच नुकसान होत नसे.रंगपंचमीच्या दिवशी त्याच फुलांचा केशरी रंग पिचकारीमध्ये भरून खेळायचा..अशाप्रकारे धुलिवंदनाचा आनंद लुटला जात असे...ही आठवण लिहीण्यामागे एकच कारण यावर्षी परदेशात "कोरोना" विषाणुची लागण पसरलेली असताना भारतातही या विषाणुबद्दल भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे..चीन अन् इतर देशातुन आयात केले जाणारे रंगपदार्थ अन् पिचकारी यावर भर न देता स्वदेशी सामान वापरण्यावर भर देण्यात येत आहे..निसर्गमयी,पर्यावरणपुरक रंग वापरण्यावर भर दिली तर  निसर्गाला पुरक  औषधी गुणधर्म असलेली पळसाची फुलं रस्त्याच्या कडेला पहायला मिळत आहेत या फुलांचा योग्य  उपयोग करून आपण ही होळी निसर्गमयी साजरी  करण्याचं आगळवेगळ समाधान मिळेल...
सर्वांना होळीच्या अन् रंगोत्सवाच्या शुभकामना!🍂🍁
     

No comments: